जामनेर शहरातील दुपारची घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- शहरातील कस्तुरी नगरात आज दि. २६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल किशोर चतुर (वय ४० रा. कस्तुरी नगर, जामनेरपुरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मोठा भाऊ असा परिवार आहे. गुरुवारी दि. २६ रोजी दुपारी १२ वाजता बायकोला माहेरून घरी जामनेरला घेऊन आला. (केसीएन)त्यावेळेला राहुल मागच्या घरात गेला. पत्नीला वाटलं, पती राहुल चतुर हे घरात आराम करत आहे. परंतु थोडया वेळाने आवाज दिला असता आवाज आला नाही. तिने घरात जाऊन पाहिले असता तिला राहुल हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
यावेळी राहुलच्या पत्नीने शेजारी लोकांना आवाज देऊन एकच हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी राहुलला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. (केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, राहुल चतुरने का आत्महत्या केली ते समजू शकले नाही. जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.