जळगाव (प्रतिनिधी )- आयुध निर्माणी वसहातमध्ये राहणाऱ्या एका महिलेने हतनूर गावातील तापी नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रिया सतिष वाणी (३२) असे महिलेचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,आयुध निर्माणी वसाहतीतील रहिवाशी अतूल सतिष वाणी (३२) रा क्वॉ न १७६ ए ( मोडीफाईड ) राहत असून, त्यांची बहीण प्रिया सतिष वाणी (३२) ही यांच्या सोबत राहत होती. दि २१ रविवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना घरातून निघुन, हतनूर गावा जवळील तापी नदीच्या पुलावरुन पाण्यात उडी मारली. येथे उपस्थीत असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्याने महिलेस वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता, तिला पाण्या बाहेर काढले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास स.पो.निरिक्षक आशिष आडसुड करीत आहे