सुप्रीम कोर्टातील याचिका,विधानसभा उपाध्यक्ष यांची कारवाई
फडणवीस-शरद पवारांची खेळी याकडे लागले महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील सत्तानाट्यामध्येमध्ये सोमवार दि.२७ जून २०२२ ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी १६ आमदारांना दिलेल्या नोटिसा, त्यावर संध्याकाळी होणारी कारवाई, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने टाकलेल्या दोन याचिका तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची खेळी नेमकी आता काय रंग भरते याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून आहे.
शिवसेना पक्षामधून सुमारे ४० आमदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गट तयार केला आहे. ते अद्यापही महाराष्ट्राच्या बाहेर गोवाहाटी येथे आहेत. शिवसेना पक्षाने पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह लता सोनवणे, चिमणराव पाटील आदी १६ आमदारांना ४८ तासात उत्तरे देण्याची वेळ दिली आहे. त्याला सोमवारी संध्याकाळी ५ वाजता शेवटची वेळ आहे. १६ आमदारांची उत्तरे आली नाही तर त्यांच्यावर विधानसभेत कारवाई होणे अपेक्षित आहे.
त्याचबरोबर दुसरीकडे शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन दोन याचिका दाखल केले आहेत. यामध्ये अजय चौधरी यांची शिवसेनेने केलेली गटनेता म्हणून नियुक्ती बेकायदेशीर आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तर १६ आमदारांना दिलेल्या नोटिसा बेकायदेशीर असल्याचीही म्हणत आव्हान दिले आहे. या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याकडे लक्ष लागून आहे.
दुसरीकडे शिंदे गटाला भाजपची फूस असून भाजपच्या केंद्र सरकारमध्ये असलेल्या सरकारने या बंडखोर आमदारांच्या परिवाराला वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र येथे सातत्याने बैठका घेत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या मदतीला धावून आले असून त्यांच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणीस आणि शरद पवार यांच्यामध्ये कोण अग्रेसर ठरतो याकडे देखील महाराष्टाच्या जनतेचे लक्ष लागून आहे. त्यामुळे २७ जून ही तारीख महत्त्वाचे ठरेल असे बोलले जात आहे…