जळगाव ९प्रतिनिधी ) – सन २०१७ व त्या आधीपासून गेल्या अनेक वर्षापासून आमचे शिक्षक बांधव प्रामाणिकपणे आपल्या आदेशान्वये बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून काम करत आहेतच.कधी कोणी चुकले असतीलही पण चुक दुरुस्त करून पुन्हा काम करत आहेतच.असे असताना तत्कालीन .तहसीलदार अमोल निकम यांनी २९/११/२०१७ रोजी शहरातील बहुसंख्य बी.एल.ओ वर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही केली. ती मागे घ्यावी अशी मागणी शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आता संबंधितांची पोलीस चौकशी सुरु झाली आहे.प्रत्यक्ष यातील अनेक बी.एल.ओ यांना कार्यालायाकडून उत्कृष्ट रेकॉर्ड जमवून काम केली असताना किरकोळ कारणामुळे फौजदारी कार्यवाही केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. तडजोडीचे प्रकार समोर येत आहे. हे ठीक नाही आजही ते लोक काम करीत आहेत.उद्याही तेच काम करणार आहेत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या प्रमाणे आपण त्यांचा सहानुभूतीने विचार करावा शासनाच्या आदेशानुसार निवडणूक असो व अन्य सर्व कामे तेच करत असतात.तरी सदर कार्यवाही थांबवणे कामी पावले उचलावी व आमच्या शिक्षक बी.एल.ओ बांधवाना दिलासा द्यावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे .