जळगाव शहर पोलीस पोलीस स्टेशनची घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एस.के.ऑईल मील परिसरात एका पत्र्याच्या खोलीतून तीन जणांचे महागडे तीन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १३ ऑगस्ट रोजी उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एस.के.ऑईल मील परिसरातील बौध्दविहार येथे सुशांत हेमराम (वय-२३) हा तरूण त्याचे मित्र कार्तीक पांडून बुदीयाला आणि दर्गा श्रीराम हेमराम यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. जळगाव शहरातील शिवाजी नगरातील रेल्वे पुलाच्या ठिकाणी कामाला आहे. १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजता घरी त्यांच्या बौध्द विहार येथील पत्र्याच्या खोलीत सर्वजण झोपलेले होते.
मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास दुर्गा श्रीराम हेमराम हा उठला असता त्याला त्याचा मोबाईल मिळाला नाही. म्हणून इतरांना देखील उठविले व मोबाईल चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार इतर दोघांचे देखील मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्याच्या मोबाईलची चोरी झाल्याचे खात्री झाल्यावर तिघांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.