जळगाव ( प्रतिनिधी ) ;- छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते कारण सामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून त्यांनी लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली होती.ते काळाच्या पुढे बघणारे होते म्हणून युगप्रवर्तक होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.मेहबूब सय्यद यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे शिवस्वराज्य दिनानिमित्त रविवारी प्रा. मेहबूब सय्यद यांचे ‘युगप्रवर्तक शिवाजी महाराज’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी.व्ही. पवार होते तर प्रभारी कुलसचिव डॉ.एस आर भादलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठातील विचारधारा प्रशाळा अंतर्गत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन व संशोधन केंद्राच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. मेहबूब सय्यद म्हणाले की नवीन मूल्यव्यवस्था,नवीन युग निर्माण करणे म्हणजेच युगप्रवर्तक होय. शिवाजी राजे हे खऱ्या अर्थाने युगप्रवर्तक होते इतिहासात असंख्य राजे होऊन गेलेत पण आजही आपण लोकशाहीत शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो.शिवाजी महाराजांपुर्वी देशात अनेक राजे होऊन गेले पण ते वंशपरंपरेने झाले होते म्हणून त्यांचे राज्य सामान्यांना आपले वाटत नव्हते.शिवरायांनी स्वतःचे राज्य स्थापन केले.सामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून व्यवस्था उभी केली. शेतकऱ्यांना सहाय्य केले. आपत्तीमध्ये त्यांचा कर माफ केला, सैनिकांकडून होणारी लूट थांबवली, उत्पन्न पाहून कर बसवला, महिलांचे शोषण थांबवले, अंधश्रद्धा मोडीत काढल्या. त्यांच्या कोणत्याही लढाया मुहूर्त पाहून लढल्या गेल्या नाहीत. समतेचे तत्व
.बी. व्ही. पवार यांनी कुलगुरू प्रा. वायुनंदन यांच्या त्यांनी जपले. राज्याभिषेक ही युगप्रवर्तक बाब होती. शिवरायांनी स्वीकारलेला भगवा हा समता, प्रगती आणि न्याय यांचे प्रतीक आहे असेही प्रा. सय्यद म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्रा.बी.व्ही.पवार यांनी प्रभारी कुलगुरू प्रा.वायुनंदन यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. शिवरायांच्या कार्याचा आढावा घेताना शिवरायां मुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला नवी ओळख मिळाली असे प्रा. पवार म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा.अजय पाटील यांनी आभार मानले. तत्पूर्वी सकाळी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत प्र- कुलगुरू प्रा.बी.व्ही. पवार, प्रभारी कुलसचिव डॉ. एस आर भादलीकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा.अजय पाटील, डॉ. सुनील पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी संगीत विभागाचे विद्यार्थी अक्षय गजभिये, निहार पत्की आणि मंगेश वाघ यांनी महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीत सादर केले.