जळगाव (प्रतिनिधी) : बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली .इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सुरेखा दुबे होत्या.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हितेश तांदळे, मंदार सोनवणे, सागर बारी यांनी जीवनात गुरुचे महत्व काय ते सांगितले. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मयुरी बारी हिने महर्षी व्यास यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. अश्विनी पाटील व दिव्या घोडके यांनी गुरुविषयी गीत सादर केले. इतर अनेक विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयातील उपशिक्षक सुनील ताडे यांनी गुरु चरित्राबद्दल माहिती दिली. तर घनश्याम काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पर्यवेक्षिका सुरेखा दुबे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये गुरु व शिष्य यांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख डी .जी. कुलकर्णी यांनी केले. तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण नेत्रा वाणी यांनी केले. मंचावर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, सुनील भदाणे, चंद्रकांत कुमावत, भरत बारी, संजय काटोले, किरण कोळी, मनीषा अस्वार, रंजना बारी, आशा कोळी, मनीषा पायधन, नंदा अकोले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीआदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुष्का अस्वार, नियती अस्वार, तेजस्विनी सुने व वैष्णवी अस्वार यांनी केले .