धरणगाव तालुक्यातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील टोळी-बांभोरी येथे गुरुवारी दुपारी शेतात काम करतांना एका शेतकऱ्याचा चककर कोसळल्याने अचानक मृत्यू झाला. या घटनेने धरणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दिपक किसन पाटील (रा. बांभोरी ता. धरणगाव)असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दीपक पाटील हे गुरुवारी सकाळपासूनच भर उन्हात शेतात काम करत होते. दुपारी ते शेतातच अचानक जागेवर कोसळले. त्यांना रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, उष्माघात सदृश्य लक्षणाने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दीपक पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.