• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

शेतकरी आंदोलनाचा परिणाम थेट भारतीय सैन्य दलावर – राज्यपाल सत्यपाल मलिक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2021
in भारत
0

जयपूर ( वृत्तसंस्था ) – मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनाचा परिणाम थेट भारतीय सैन्य दलावर होत असल्याचा गंभीर इशारा दिलाय. सैन्याच्या दोन जनरल पदावरील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच काहीही होऊ शकतं, असा इशारा दिल्याचं मलिक यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कारगिल युद्धाच्यावेळी सरकारच्या चुकीची किंमत शेतकऱ्यांच्या मुलांना चुकवावी लागली असल्याचाही आरोप केला. ते तेजा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या जयपूरमधील जागतिक जाट संमेलनात बोलत होते.

सत्यपाल मलिक म्हणाले, “सैन्याचे दोन जनरलने सांगितलं की शेतकरी आंदोलन भारतीय सैन्य दलावरही परिणाम करत आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. आज तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर आहात, अहंकारात काहीही करत आहात. मात्र, याचे काय पडसाद पडतील हे तुम्हाला माहिती नाही.”

“कारगिली युद्ध झालं तेव्हा शेतकऱ्यांची २० वर्षांची मुलं पर्वतावर चढली. शत्रू कारगिलमध्ये घुसला ही सरकारची चूक होती असं मला वाटतं. मात्र, याची किंमत शेतकऱ्यांच्या मुलांना चुकवावी लागली. हा अन्याय शेतकऱ्यांसोबतच होत आहे. लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत मात्र एक दिवस यावर शेतकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया उमटू नये असं मला वाटतं. आतापर्यंत शेतकऱ्यांनी दगड उचललेला नाही,” असंही मलिक यांनी नमूद केलं.

शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचं सत्यपाल मलिक यांनी सांगितलं. ते म्हणाले, “मी खूप दुखावलो होतो आणि रागावलो होतो. मी पंतप्रधान मोदींना भेटलो आणि त्यांना ते परिस्थितीचं चुकीचं आकलन करत असल्याचं सांगितलं. या शिख किंवा जाटांना पराभूत करता येणार नाही. तुम्हाला वाटतं हे शेतकरी सहजपणे निघून जातील, पण तसं होणार नाही. त्यांच्या मागण्या मान्य करा. त्यांच्यासोबत दोन गोष्टी कधीही करू नका. एक त्यांच्यावर बळाचा वापर करू नका आणि दुसरं त्यांना मोकळ्या हाती पाठवू नका. कारण ते शेकडो वर्षे असं वर्तन विसरत नाहीत.”

“मी काहीही सोडू शकतो पण शेतकऱ्यांवरील अन्याय पाहू शकत नाही. मी पदावर असताना शेतकऱ्यांचा पराभव होत आहे हे मला सहन होत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीच नाही. सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूचे लोकही आहेत. मात्र, एक-दोन व्यक्तींच्या डोक्यात सत्तेची नशा इतकी गेलीय की त्याला जमीनच दिसत नाहीये. मात्र, गावाकडे सांगितलं जातं की रावण देखील अहंकारी होता. एक दिवस यांनाही कळेल की ते चुकीचे आहेत. मला वाटतं तो दिवस लवकरच येईल. शेतकरी पराभूत होऊन दिल्लीहून परतणार नाही. ते हवे तितके दिवस आपलं आंदोलन सुरूच ठेवतील,” असंही त्यांनी सांगितलं.

मलिक यांनी शिखांच्या रागाची काही ऐतिहासिक उदाहरणंही नमूद केले. ते म्हणाले, “माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अकाली तख्त येथे ऑपरेशन ब्लूस्टार केलं. यामुळे शिख समुदाय दुखावले. याची किंमत त्यांना आपला जीव देऊन चुकवावी लागली. सैन्य दलप्रमुख जनरल ए. एस. वैद्य यांची देखील निवृत्तीनंतर पुण्यात हत्या झाली. जालीयनवाला बाग हत्याकांडानंतर जनरल डायर यांची लंडनमध्ये हत्या झाली.” यावेळी मलिक यांनी दिल्लीत लाल किल्ल्यावर झालेला प्रकाराचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नसल्याचंही मत व्यक्त केलं.

सत्यपाल मलिक म्हणाले, “मी पंतप्रधानांना सांगितलं, ‘तुम्ही राजा आहात, तुम्ही मोठे आहात. तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की तुमचं चुकलं आणि मी बरोबर असूनही तुमची वेदना सहन होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत आहे. असं केलं तर तुम्ही आणखी मोठे व्हाल. यावर मोदी काय म्हणाले किंवा त्यानी कशी प्रतिक्रिया दिली हे मी तुम्हाला सांगणार नाही.’”

मलिक म्हणाले, “जेव्हा जेव्हा मी शेतकरी आंदोलनावर बोलतो तेव्हा तेव्हा दिल्लीवरून कॉल येतो की काय असं वाटतं. माझे हितचिंतक माझ्या वक्तव्यांमुळे मला कधी हटवलं जातंय याची वाट पाहतात. मात्र, राज्यपालांना हटवलं जाऊ शकत नाही. मला सोशल मीडियावर विचारतात की मला असं वाटतंय तर मी राजीनामा का देत नाही. मी त्यांना विचारतो की तुमच्या वडिलांनी मला नियुक्त केलंय का? मी मतदानाने राज्यपाल झालो नाही. मला दिल्लीतील २-३ व्यक्तींनी नियुक्त केलंय. मी त्यांच्या इच्छेविरुद्ध बोलतो आहे. ज्या दिवशी ते यावर आक्षेप घेतील आणि मला पद सोडायला सांगतील त्या दिवशी राजीनामा द्यायला मी एक मिनिटही घेणार नाही.”


 

 

Previous Post

जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; चार जवान शहीद

Next Post

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार ! ; सर्व २४ उमेदवारांची माघार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार ! ; सर्व २४ उमेदवारांची माघार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीचोराच्या बऱ्हाणपूर येथून आवळल्या मुसक्या, सव्वा दोन लाखांची ३ वाहने जप्त
1xbet russia

दुचाकीचोराच्या बऱ्हाणपूर येथून आवळल्या मुसक्या, सव्वा दोन लाखांची ३ वाहने जप्त

September 17, 2025
रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश
1xbet russia

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

September 17, 2025
राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी
जैन कंपनी

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी

September 17, 2025
शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
1xbet russia

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

September 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीचोराच्या बऱ्हाणपूर येथून आवळल्या मुसक्या, सव्वा दोन लाखांची ३ वाहने जप्त

दुचाकीचोराच्या बऱ्हाणपूर येथून आवळल्या मुसक्या, सव्वा दोन लाखांची ३ वाहने जप्त

September 17, 2025
रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

September 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon