जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाले असून त्वरित पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय कोळी समाजातार्फे जिल्हाधिकारी यांना जिल्हा युवा अध्यक्ष धनराज साळुखे यांनी निवेदन देवून केली.

यावर्षी झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे जळगाव, धुळे, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उडीद, मुंग पिकांना अक्षरश: कोंब येवून खराब झालेले आहे. कापूस, ज्वारी, सोयाबीन, मका या पिकांवर बुरशीजन्य रोग पसरल्याने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. आधीच बळीराजाने विविध बँका, पतसंस्था, खाजगी सावकाराकडून तसेच नातेवाईकांकडून हात उसनवार पैसे आणून शेतीच्या मशातगीसाठी खर्च केलेला आहे. शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून नापिकीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही.
शासनाने शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये भरपाई देण्यात अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष धनराज साळुखे, गणेश कोळी, अनिल नन्नवरे, कृष्णा सपकाळे, रमाकांत सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.







