मुंबई (वृत्तसंस्था ) – महाराष्ट्रातील पालघरजवळ 54 वर्षीय मिस्त्री यांची मर्सिडीज जीएलसी 220 कार रस्ता दुभाजकावर आदळली. यामध्ये मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पंडोल (49) यांचा मृत्यू झाला, तर कार चालवत असलेल्या महिला डॉक्टर अनायता पंडोल आणि त्यांचे पती दर्यास पंडोल जखमी झाले. मात्र, आता शवविच्छेदनातून मिस्त्रीयांच्या मृत्यूचं कारण समोर आलं असून जे. जे. रुग्णालयात त्यांचं शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदन अहवालानुसार या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या शरीराच्या अंतर्गत भागात गंभीर दुखापत झाल्याचे मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय भाषेत याला पॉलीट्रॉमा म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस आणि जहांगीरचे पोस्टमॉर्टम रविवारी रात्री मुंबईतील जे. जे. रुग्णालयात झाले. आता त्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
माध्यमांशी बोलताना डॉक्टर शुभम सिंह यांनी सांगितले की, प्रथम दोन रुग्णांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापैकी एक सायरस मिस्त्री आणि दुसरे जहांगीर दिनशा पंडोल होते. दोघांनाही जेव्हा रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा येथे येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना घेऊन आलेले स्थानिक सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितात. जहांगीर दिनशा पंडोल हे गंभीर जखमी झाले होते पण, त्यांचा अपघात स्थळाहुन रुग्णालयात आणताना मृत्यू झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही त्यांना मृत घोषित केले.” असं डॉक्टर सिंह यांनी सांगितलं आहे.
जे. जे. रुग्णालयाच एक्सपर्ट ओपिनियनसाठी : डॉक्टर सिंह पुढे सांगतात की, “शवविच्छेदन सरकारी रुग्णालयात होणार होते, तथापि, जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यांना ‘तज्ञांच्या मतासाठी’ जे. जे. रुग्णालयात हलवावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मृतदेह मुंबईला पाठवण्यात आला. सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि जहांगीर दिनशा यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि डोक्याला दुखापत झाली होती. त्याचे पोस्टमॉर्टम येथे होणार होते, परंतु आम्हाला जिल्हाधिकारी आणि एसपींचा फोन आला की तज्ज्ञांच्या मतासाठी मृतदेह जे. जे. रुग्णालयात हलवावा लागेल.” अशी प्रतिक्रिया डॉक्टर शुभम सिंह यांनी दिली आहे.