शक्ती फाऊंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य स्थापन करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिकांनी कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही, असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी केले.
येथील विवेकानंद नगर येथे शक्ती फाऊंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उद्देशिका वाचन तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन भेट वस्तू देण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आ. राजूमामा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, माजी महापौर सीमाताई भोळे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी-कोल्हे, दर्जी फाऊंडेशनचे गोपाल दर्जी, प्रभागाच्या माजी नगरसेविका सिंधुताई कोल्हे, लीनाताई पवार, योगिताताई पाचपांडे, ज्योती गोपाल दर्जी, शिवसेनेच्या शोभा चौधरी, शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष भारतीताई रंधे, निशा पवार, ममता जंजाळे व सुषमा चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. आ. राजुमामा भोळे यांनी संविधानाप्रति आपले कर्तव्य व संविधानाचे वैशिष्ट्य समजावून सांगितले. ललित कोल्हे, गोपाळ दर्जी, सरिताताई माळी यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. परिसरातील महिलांना हळदी कुंकू लावून भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन शक्ती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भारती जि. रंधे यांचे होते. तसेच कार्यक्रमासाठी विवेकानंद नगर परिसरातील मिलिंद चौधरी, गजानन पाटील, अशोक पाटील, प्रमोद पाटील, विलास सुतार, सतीश राजपूत, योगेश पाठक, धीरज चौधरी, प्रकाश सोनावणे, किरण पाटील, मोनू पाटील, सोपान पाटील, ॲड.अभिजीत रंधे, आकाश भंगाळे, मोहित सावडेकर, मयूर देशमुख, प्रियांका नारखेडे, सुनंदा सुतार, नेहा तळेले, प्रियांका रंधे, लक्ष्मी बोराडे, मृणालिनी रंधे यांनी परिश्रम घेतले.