जळगाव ( प्रतिनिधी ) – १२ अंकी ग्राहक क्रमांक अद्ययावत होत नसल्याच्या जाचातून मुक्तता करून जळगावातील सुप्रीम कॉलनी भागातील नागरिकांना दिलासा द्यावा आणि स्वस्त धान्य सहज उपलब्ध करून द्यावे या मागणीचे निवेदन आज स्थानिक रहिवाशांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले .
या निवेदनात पुढे म्हटले आहे की , कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत सुप्रीम कॉलोनी परिसरातील नागरिकांकडे स्वस्त धान्य कार्ड आहेत मात्र स्वस्त धान्य मिळण्यास त्रास होत आहे . सुप्रीम कॉलनी परिसरात स्वस्त धान्य दुकान नसल्यामुळे मेहरूण परिसरात ४ कि.मी. प्रवास करावा लागत आहे . सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांचा बारा अंकी स्वस्त धान्य ग्राहक क्रमांक अद्ययावत न झाल्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे . १२ अंकी स्वस्त धान्य ग्राहक क्रमांक करण्यासाठी तहसील कार्यालयात नागरिक ये – जा करत असूनसुद्धा हा क्रमांक मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत .चौकशी करून संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावे व १२ अंकी स्वस्त धान्य ग्राहक क्रमांक नसेल तरीसुद्धा रेशन धारकांना धान्य वितरण करण्यात यावे . सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी नव्याने स्वस्त धान्य दुकान सुरु करण्यासाठी संबंधित विभागास आदेश द्यावेत
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ललित कोळी यांच्यासह कल्पेश निकम , अतुल पाटील , शुभम चव्हाण , प्रवीण पाटील , राहुल पाटील , नथू पाटील , मनोज कुमार , मोहन कोळी आदींनी पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन दिले