जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विविध स्वरूपातील कारणांचा समग्र विचार करून तात्काळ नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन आज अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की , दोन दिवसापुर्वी जिल्हयात अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये मोठया प्रमाणात नुकसान झाले पुराच्या पाण्याच्या तडाख्यामुळे अनेक ठोतकऱ्यांच्या गायी , म्हशी , बैल, कोंबडया, शेळ्या मृत्यूमुखी पडल्या शेतकर्यांच्या पिकांचे व फळ बागायतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेते पुराच्या पाण्यात वाहून गेली .काही ठिकाणी जिवीतहानीदेखील झाली आहे.
नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे , फळ बागायतीचे, पिकांचे तसेच मृत्यूमुखी पडलेल्या गुरा-ढोरांचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन लाख रुपये नुकसान भरपाई त्वरीत द्यावी. अशी भरपाई देताना कुठल्याही प्रकारच्या कागदांची पुर्तता न करता थेट शेतकऱ्यांना भरपाईची मदत व्हावी.
पुराच्या पाण्यात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येकी गायीसाठी ७०,०० ० रुपये , म्हशींसाठी १ लाख रुपये , बैलजोडीस प्रत्येकी दीड लाख रुपये , शेळ्यांसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये आणि कोबडयांसाठी प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे त्वरीत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यासाठी कर्ज स्वरुपात आर्थिक मदत उपलब्ध करुन द्यावी पिक विम्याच्या आर्थिक नुकसानीच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांच्या फळ बागायंतीचे नुकसान झालेले आहेत, त्यांना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर दिल्या जाणाऱ्या भरपाईप्रमाणेच जिल्हयातील शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. ज्या शेतकऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्तीची जिवीतहानी झाली आहे, त्यांना त्वरीत अर्थसहाय्य देण्यात याबे. पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.







