शेत शिवार गजबजले,
कृषी बाजारपेठेत हालचाली सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – उशिराने, पण दमदारपणे दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची पेरणीपूर्व मशागतींसाठी आणि पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. संततधार सुरू राहिल्यास आगामी १५ दिवसांत पेरण्या उरकण्याचा अंदाज आहे.
साधारण १५ जूनपर्यंत मोसमी पाऊस राज्य व्यापून पुढे वाटचाल करतो. यंदा २५ जूनची वाट पाहावी लागली. त्यामुळे शेतीची पेरणीपूर्व आणि पेरणीची सर्व कामे खोळंबली होती. शनिवारी, रविवारी अपवाद वगळता जळगाव जिल्ह्यात सर्वदूर हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतशिवारात वर्दळ वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांची उन्हाळी मशागती झाल्या आहेत, त्यांची पावले बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांकडे वळत आहेत. संततधार पाऊस सुरू राहिल्यास शेतकरी घाई करून पुढील १५ दिवसांत पेरण्या उरकून घेतील, अशी स्थिती आहे.
जळगाव जिल्ह्यात काही भागात रिमझिम स्वरूपात पावसाचे आगमन झाले आहे. अन्यत्र अद्याप प्रतीक्षा आहे. आकाशात काळे ढग
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतशिवारात शांतता आहे. जिल्ह्यात काहींनी पावसाची वाट न बघता धूळ-पेरणी सुरु केली आहे. विहिरींचीही खालावलेली पातळी भरू लागली आहे. लहान धरणे, पाझर तलाव आणि मोठ्या धरणाची पातळी वाढण्यास झालेल्या पावसाने मदत होणार आहे.
मंगळवारी झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. बियाणे बाजारात गर्दी दिसत आहे. पुढील चार दिवस पावसाचा अंदाज असल्याने मोठ्या पावसाची सर्वत्र प्रतीक्षा आहे. अद्यापि सर्वदूर पाऊस झालेला नाही. पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण न झाल्याने शेतकऱ्यांना आणखी काही दिवस पेरणीसाठी थांबावे लागणार आहे. जोपर्यंत शंभर मिलीमीटर पावसाची नोंद होऊन जमिनीत पुरेशी ओल तयार होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी खात्याने दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी विदर्भात मोसमी पाऊस दाखल झाला, काही ठिकाणी पावसाच्या सरीही आल्या. पण दुसऱ्याच दिवशी त्याने उसंतही घेतली.