पारोळा (प्रतिनिधी) – पारोळ्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या भु संपादनात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला उर्वरित मोबदला जिल्हाधिकारी यांनी मंजूर केल्या नंतरही महामार्गच्या अधिकाऱ्यांनी दिला नाही. शेतजमिनी भु संपादन करून महामार्गाचे काम सुरू असून सातबारा उताऱ्यावरदेखील राष्ट्रीय महामार्ग नाव दाखल झाले आहे. हक्काचा उर्वरित मोबदला मिळत नाही तोपर्यन्त चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका ५२ शेतकऱ्यांनी घेत रस्त्यावर माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांनी केले .
विचखेडे व म्हसवे या भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या त्यांना पहिल्या हप्त्यासह उर्वरित मोबदला वितरित करण्यात आला.मग ५२ शेतकऱ्यांना उर्वरित मोबदला देण्यासाठी टाळाटाळ का ?असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी करीत मोबदला द्या व कामाला सुरुवात करा असे सांगत या शेतकऱ्यांनी आंदोलनला सुरुवात केली.
आज दुपारी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नविन महामार्गावर रास्ता रोको करुन काम बंद पडले यावेळी मोठा फौज फाटा होता .तालुका कृषी कार्यलयापासून बायपासचे काम रखडले आहे धरणगांव माथाचे काम चार वर्षापासुन सुरु आहे . धुळे नविन महामार्गाला जोडल्या गेलेल्या रस्त्यात ५२ शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गने हस्तातरीत करून बायपास रस्त्याला सुरुवात केली . मात्र बायपास रस्त्यात ज्या ५२ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना तुटपुंजी रक्कम देऊन काम सुरु केले . ठरलेली रक्कम देणे असतांनासुध्दा काम सुरुच ठेवल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून काम बंद पाडले . या वेळी महामार्गचे अधिकारी यांनी शेतकऱ्याच्या विनवण्या केल्या . मात्र शेतकरी मागणीवर ठाम राहिल्याने रस्त्याचे सुरु असलेले काम बंद पाडले .
डिवायएसपी . राकेश जाधव , तहसिलदार अनिल गवांदे , महामार्गाचे अधिकारी व शेतकऱ्यामध्ये चर्चा होवून दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व महामार्गाचे सिन्हा यांची बैठक बोलवू तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावे असा तोडगा निघाला .
या वेळी गोविंद शिरोळे , पांड्ररंग पाटील , भिवसन पाटील , भावडू खाडे , युवराज पाटील , रावण पाटील , साहेबराव पाटील , विजय पाटील , नाना पाटील , राघो पार्टील , किशोर पाटील , पिंताबर पाटील आदी शेतकरी सामिल झाले होते .