जळगांव (प्रतिनिधी ) – प्रत्येक गावातील शिवारांना रस्त्यांनी जोडण्यासह आवश्यक कामांना गती मिळाली आहे. विकासात कोणताही भेदभाव नसून ग्रामस्थांनी कामे सुचवल्यास तात्काळ निधीसाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.तरडे आणि अहिरे बुद्रुकमध्ये शेतरस्त्यांचे डांबरीकरण आणि अन्य सुमारे १ कोटी ३० लक्ष रूपयांच्या कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शेत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाप्रमुख गजानन पाटील, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, उपतालुका प्रमुख पवन पाटील, उपसभापती प्रेमराज बापू पाटील, दीपक सोनवणे, डी. ओ. पाटील, लोकनियुक्त सरपंच अशोक पाटील, उपसरपंच सौ. अनिता पाटील, परिसरातील सरपंच भैय्या पाटील, डॉ. विलास पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक, सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सरपंच चंद्रशेखर भाटीया व युवा सेना उपतालुका प्रमुख पवन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांनी केले.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चमगाव फाटा ते उखळवाडी शेतरस्त्याचे डांबरीकरण ( ५० लक्ष रूपये ) ; तरडे ते भवानी माता मंदिर शेतरस्त्याचे डांबरीकरण ( ५० लक्ष रूपये ) या दोन रस्त्यांच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. अहिरे बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपुजन ( १० लक्ष ) आणि रस्ता कॉंक्रीटीकरण ( ६ लक्ष रूपये ) या कामांचा शुभारंभकरण्यात आला.तरडे येथील सामाजिक सभागृहाचे भूमीपुजनदेखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील आणि तालुकाप्रमुख गजानन पाटील यांनी मनोगतातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे कौतुक केले.
शेतरस्ते इतिहासात पहिल्यांदाच डांबीकरणाच्या माध्यमातून तयार करण्यात येत असून शेत-शिवार जोडल्यास याचा शेतकर्यांना आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला लाभ होणार असून याचमुळे आपला शेतरस्त्यांवर प्रामुख्याने भर असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शेतरस्त्यांच्या कामांच्या भूमिपुजनाचा मान युवासेवा उपतालुका प्रमुख पवन पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांना दिला. फलकाचे अनावरण करत असतांना स्वत: पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हातात स्मार्टफोन घेऊन त्यांची छायाचित्रे काढली. ना. गुलाबराव पाटील यांचा साधेपणा आणि कार्यकर्त्यांना सन्मान प्रदान करण्याच्या स्वभावाचे याप्रसंगी उपस्थितांनी कौतुक केले.