पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील गिरडरोडवरील महावितरण विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता थानवी यांच्या अध्यक्षतेखाली लाईनमन दिन साजरा करण्यात आला आहे. सुरुवातीला कार्यालयातून मोटर सायकलने रॅली काढण्यात आली होती. यामध्ये गिरड रोडवरून थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाहेरपुरा, आठवडे बाजार,जामनेर रोड पोलीस लाईन तसेच भडगाव रोड मार्गी या रॅलीची सांगता झाली. पाचोरा येथील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला सीमेवरील शहिदांना तसेच अपघातात मृत्युमुखी झालेल्या वायरमन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या हस्ते महावितरणच्या वायरमन मंडळींचा सत्कार सामूहिकरित्या करण्यात आला. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेलोडे यांनी सांगितले कि, आपल्या जीवाची सुरक्षा ठेवनूच काम करा. आपल्यावर जरी कंपनीच्या ग्राहकांची जबाबदारी तर आहे, परंतु त्याबरोबर आपल्या परिवाराची देखील जबाबदारी आपल्याच खांद्यावर असून काळजीपूर्वक काम करा. अत्याधुनिक साहित्यांचा वापर करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करत राहा असे यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात थानवी यांनी वायरमन बांधवांना लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देत महावितरण कंपनीचा पाया म्हणजेच आमचे लाईनमन बांधव आहेत. त्यांच्यामुळेच कंपनी आहे. लाईनमन ही आमच्या कंपनीची संपत्ती असून त्या संपत्तीच्या माध्यमातून आमची नागरिकांना सेवा देण्याचे कार्य हे शेवटच्या घटकापर्यंत करता येते. महावितरण कंपनी ही ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी कंपनी असून कोरोना सारख्या गंभीर परिस्थिती मध्ये सुद्धा आमच्या वायरमन बांधवांकडून अखंडित विज पुरवठा करण्यात आला होता, असे सांगितले. यावेळी अनेक लाईनमन बांधवांनी आपल्या व्यथा या ठिकाणी मांडल्या.
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे, त्याचबरोबर सहाय्यक अभियंता पांचाळ, हर्षल महाजन, अजय कुमार मिश्रा, भरत उकलकर,धनंजय पाटील, हर्षा सोनवणे, लाईनमन तसेच कर्मचारी बबलू आदिवाल, अमोल राजपूत, किशोर पाटील,मनोज पाटील, किरण पवार, दिपक पाटील,जितेंद्र माळी, प्रवीण वंजारी व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.