जळगाव (प्रतिनिधी) – तरूणांमधील नवसंकल्पांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे राज्यभर स्टार्टअप यात्रा काढण्यात आली असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी या यात्रेचे उद्घाटन केले.
उद्योजकीय नवसंकल्पनांसाठी या यात्रेतून जनजागृती केली जाणार आहे. या संकल्पनांसाठी रोख पारितोषिके देखील शासनाकडून दिले जाणार आहे. यात्रेतील मोबाईल व्हॅन ही शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी जनजागृती करेल. विद्यापीठात या स्टार्टअप यात्रेच्यावेळी नवसंशोधन, नवोपक्रम व सहचर्य कंपनीचे संचालक प्रा.भूषण चौधरी, प्रा. विकास गिते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नितेश मल्होत्रा, निखील कुलकर्णी, दुष्यंत बांभोडे आदी उपस्थित होते.