जळगाव ( प्रतिनिधी ) – राजा शिवछत्रपती परिवाराच्या जळगाव विभागातील मावळ्यांनी सातपुड्याच्या डोंगर रांगेत असलेल्या किल्ले विजयगडाच्या पायथ्याशी 31 जुलैरोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व परिवाराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण व बीजरोपण मोहिमेचे आयोजन वन विभागाच्या सहकार्याने केले होते.
या मोहिमेला जिल्हाभरातून108 मावळे व रणरागिणी उपस्थित होते याप्रसंगी वड , पिंपळ , बेल , निंब , शिसम आदी75 देशी वृक्षांचे वृक्षारोपण करत त्यांना ट्री गार्ड लावून संरक्षित करण्यात आले मागील वर्षी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस त्याचे औक्षण करीत छत्रपतींच्या जयघोषात साजरा करण्यात आला , त्रिवेणी मंदिर परिसरात नाल्याचा बांध ढासळून गेला होता त्यामुळे पाण्याचा साठा न होता ते वाहून जात होते त्या बांधात जवळपास 12 ट्रॅकटर माती व मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आली.
उप विभाग प्रमुख अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केले मोहिमेसाठी चोपडा येथील वन विभागीय अधिकारी समाधान सोनवणे यांनी भोजनाची व्यवस्था केली होती व बांधाच्या दुरुस्तीसाठी बंटी दादा यांनी ट्रॅकटर व सोनवणे सर यांनी जेसीबी उपलब्ध करून दिले होते मोहीम यशस्वी होण्यासाठी महेंद्र राजपूत , विश्राम तेले , सागर पाटील , किरण शिरसाठ , पंकज शिंदे , योगेश ठाकरे, शांताराम पाटील व वन विभागाचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली