मुंबई ( प्रतिनिधी ) जळगावातील आशादीप महिला वसतीगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली कुठलेही चुकीचा प्रकार घडलाच नसल्याची माहिती समितीने केलेल्या चौकशीतून समोर आल्याची माहिती आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांना व विधानसभेत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती असी जळगावातील आशदीप महिला वसतीगृहातील कथित व्हिडीओ प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच उच्च स्तरीत समितीचे गठन करून चौकशी करून दोन दिवसात अहवाल
मांडण्यात येईल असे जाहीर केले होते.
या अनुषंगाने आयएएस अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या नेतृत्वाखालील समितीने काल सकाळी दहापासून रात्री उशीरापर्यंत चौकशी केली. यानुसार आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन दिले. यात म्हटले आहे की, त्या वसतीगृहात काही दिवसांपूर्वी काही महिला गाणी म्हणत होत्या. मात्र यात आरोप करण्यात येत असलेला प्रकार झालाच नाही. या प्रकरणी अफवा पसरवणार्यांवर कडक कारवाई होईल असेही गृहमंत्री म्हणाले.