जळगाव(विशेष प्रतिनिधी) माणुस जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेला तरी आपली शिकवण व सवयीमुळे तेथील वातावरण निर्माण करून जातो असेच प्रा. उमेश पाटील व त्यांच्यां सहकार्याच्यां प्रयत्नातून आहे.पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा असलेला लहानच्या गावात सकाळ आणी संध्याकाळी गावातील तरूण, लहान व जेष्ठ मंडळी रोज ठरावीक अंतर ठेऊन व सर्व नियमांचे पालन करून नियमीत योगा व व्यायाम करुन आपले व आपल्या गावाचे स्वास्थ जपत आहे. कोरोनामुळेच सर्वत्र लॅाकडाऊन असल्यामुळे व ग्रामीण भागात मेडीकल सेवा कमी असल्यामुळे कोनालाही आरोग्य संदर्भात संकट येऊ नये या उद्देशाने योगा आरोग्याचे फायदे यांचा प्रसार व प्रचार गावात करतांनां ही मंडळी दिसत आहे. त्यामध्ये व्यायमाचे फायदे योगाचे महत्व दारू गुटखा अश्या व्यसनापासुन होणारे नुकसान यासह जनजागृती व्यायाम करूनच हा उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये गावातील उपसंरपंच गिरीष पाटील , संदिप पाटील, रवीद्र परदेशी , जगतसिंग कच्छवे , किशोर पाटील ,शुभम पाटील, ज्ञानेश्वर पाटील , सचीन पाटील , मंगेश परदेशी इत्यादी तरुण हा उपक्रम गावात राबवत आहे.
एकच ध्यास गावाचा निरोगी विकास-उपसंरपंच गिरीष पाटील
एकच ध्यास गावाचा निरोगी विकास हा मंत्र आत्मसात करूण तरूण मीत्रांना आरोग्यमय होण्याचे संदेश देत आहोत.येणारी युवक पीढी ही गावाची शिदोरी आहे. गावातील युवकांनां जास्तीत जास्त मोबाईल इंटरनेट या सगळ्या जाळ्यातुन बाजुला ठेवुन व्यायमाच्या माध्यमातुन आपले स्वास्थ जपण्यासाठीचे आम्ही जागृकता आम्ही निर्माण करत आहोत. त्यासाठी प्रा. उमेश पाटील हे आम्हाला मदत करत आहे.मी स्वस्वतः रोज सकाळी जॉगींग व योगाकरून बाकी मंडळीनां येण्यास प्रवृत्त करतो.असे उपसरपंच गिरीश पाटील यांनी सांगितले.
आरोग्य विषयक समस्या दूर होऊ लागल्या – रवींद्र परदेशी
मी लॉकडाऊन सुट्टी असल्यामुळे मी मुंबईहुन गावाकडे आलो प्रा . उमेश पाटील यांच्यां सोबत या उपक्रमाला सुरवात केली आणी बघता बघता गावतील तरूण मंडळी यात सहभाग घेऊ लागली व या उपक्रमामुळे बरेच लोकांनां आरोग्य विषयक समस्या दुर होऊ लागल्या आणी ते आमच्या उपक्रमात सहभाग घेऊन व्यायम व योगा करू लागले हा आरोग्यमंत्र आम्ही गावकऱ्यांनां दिला. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला शहराप्रमाणे आता आमचे गाव फीट होऊ लागलय याचा आम्हाला आंनद असल्याचे रवींद्र पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आरोग्याबाबत जनजागृती केल्याचा अभिमान आहे-प्रा उमेश पाटील
लॉकडाऊन गावात आलो तेव्हा गावात सकाळ संध्याकाळ व्यायाम हा प्रकार नव्हता . अशा वेळेच सहाकारी मीत्रांनां घेऊन आम्ही स्वतः सकाळ संध्याकाळ व्यायमाला सुरवात केली.आणी त्यांच्यां माध्यमातुन गावातील तरुण मंडळीनां याकडे वळवण्यास सुरवात केली. आज बरीच मंडळी आमच्या गावात आरोग्याकडे लक्ष देत आहे. मी क्रीडाशिक्षक असण्यामुळे थोडी आरोग्याची जनजागृती करता आली यांचा मला अभीमान आहे.असे श्री व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.उमेश पाटील यांनी केशरीराज शी संवाद साधतांना सांगितले.