जळगाव – गिरणा धरणातून गुरुवारी 17 रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास 1 हजार 200 क्युसेसने एका दरवाज्यातून पाणी सोडण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाकडुन सांगण्यात कळवण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास अजुन वाढू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
गिरणा धरण बुधवारी 16 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शंभर टक्के भरले. मात्र पाणलोट क्षेत्रातील धरणातून पाण्याचा विसर्ग कमी असल्याने पाणी सोडण्यात आले नव्हते. सकाळी पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा एक दरवाज्यातून 1 हजार 200 क्युसेसने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गिरणा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास अजुन पाण्याचा विसर्ग वाढू शकतो असे गिरणा पाटबंधारे विभागाकडुन सांगण्यात आले. धरणातून पाणी सोडल्याने गिरणा नदीला पुर येणार आहे. त्यामुळे नदी किनारी गावक-यांनी तसेच नागरिकांनी कोणीही नदीत जावू नये असा इशारा आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून दिला आहे.
गिरणा धरणातून 1200 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदिकाठावरील गावकर्यानी सतर्कता बाळगावी. पाण्याचा जाऊ नये, असे गिरणा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता
धर्मेद्रकुमार बेहरे यांनी म्हटले आहे.