दिल्ली (वृतससंस्था) – केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहून संवाद साधला होता. मात्र त्यांच्या पत्रावरून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर सरकारने देश व सामान्य माणसाच्या हिताविषयी गंभीरपणे चिंतन करावे, असा सल्लाही दिला आहे.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मायावती यांनी ट्विट केले आहे. केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपा सरकारकडून वर्षपूर्ती झाल्याबद्दल अनेक दावे केले जात आहेत. पण सत्य परिस्थिती आणि नागरिकांच्या आकलनापासून नसतील तर चांगले आहे. खरंतर भाजपा सरकारचा कार्यकाळ वादांनी घेरलेला राहिला. त्यामुळे त्यांनी देश व सामान्य माणसाच्या हिताविषयी गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. देशातील जवळपास १३० कोटी संख्येमध्ये गरीब, बेरोजगार, शेतकरी, स्थलांतरित मजूर व महिला यांचं जीवन आज पूर्वीपेक्षा अधिक त्रासदायक झाले आहे. जे की अतिशय दुःखद आहे. हे लवकर विसरता येणार नाही, असे मायावतींनी यांनी म्हटले आहे.
अशा परिस्थितीत केंद्र सरकारने आपली धोरण आणि काम करण्याच्या पद्धतीची समीक्षा करायला हवी. ज्या ठिकाणी उणीवा दिसून येतात, त्यावर पडदा टाकण्याऐवजी त्या दूर करायला हव्यात. देशाहितासाठी बीएसपी भाजपाला हाच सल्ला आहे, असे मायावती यांनी म्हटले आहे.