मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने आज एका परिपत्रकानुसार ( राभादु-2117/प्र.क्र.157/ना.पु.31 ) नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीचा कार्यक्रम जाहीर केला आहे .
या कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे १ जानेवारी ते ३१ मार्च व १जुले ते ३० सप्टेंबर असे दोन टप्पे करण्यात आले आहेत . नविन दुकानाकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे.ही कामे १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत केली जाणार आहेत
दुसऱ्या टप्प्यात ही कार्यवाही १ ते ३१ ऑगस्ट पर्यंत केली जाणार आहे
पहिल्या टप्प्यात १ ते ३१ मार्च आणि दुसऱ्या टप्प्यात १ ते ३० सप्टेंबरपर्यंत स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी दिली जाणार आहे . रद्द झालेल्या शिधावाटप परवान्यांविरुद्धचे अपील न्यायालय, मंत्री / राज्यमंत्री , नियंत्रक ( शिधावाटप ) संचालक / उप आयुक्त (पुरवठा ) यांच्याकडे व सुनावणी उपनियंत्रक
, जिल्हा पुरवठा अधिकारी , अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असेल तर अंतिम निर्णय होईपर्यंत त्याठिकाणी नविन दुकान मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येऊ नये अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत .
यापुढे वर्षातून दोन वेळा दुकाने व परवाने मंजूर केले जाणार आहेत राज्यातील काही जिल्ह्यांना विविध निवडणूका व आचारसंहिताचा कालावधी , कोव्हीड-१९ लॉकडाऊन पुर परिस्थिती अशा कारणांमुळे नवीन दुकानांना मंजुरी देण्याची कार्यवाही पूर्ण होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे . राज्य सरकारचे अवर सचिव गजानन रा. देशमुख यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.