जळगांव (प्रतिनिधी) – नशिराबाद येथील आठवडे बाजारामधील विकास सोसायटी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मध्यवर्ती कार्यलयाचे उद्धघाटन नुकतेच दि. 24 रोजी मोठ्या थाटात पार पडले.
यावेळी मनसे नेते माजी आ. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे, मनवीसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, आशिष सपकाळे, रज्जक सय्यद, किरण तळेले आदींच्या उपस्थितीत उद्धघाटन झाले.
कार्यक्रम प्रसंगी मनसे नेते बाविस्कर व जमील देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच येणाऱ्या काळात मनसे हाच जनतेचे स्वप्न साकार करणार आहे तरी कार्यकर्त्यांनी आता पासून कामाला लागा, असेही उद्गार यावेळी निघाला, यावेळेस जळगाव ग्रामीण मधील युवकांनी मनसेत प्रवेश केला, तर नशिराबाद नगर पंचायत मध्ये पहिला नगरदयक्ष हा मनसेचा आणण्यासाठी श्री रोटे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली, तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक सुद्धा या ठिकाणी करण्यात आले. तसेच गावकऱ्यांनी त्याच्या खंबीर पाठीशी उभे राहावे, असे आ.बाविस्कर यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलं आगामी येणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व च्या सर्व जागा लढणार व पहिला नगराध्यक्ष हा मनसेचा होणार असेही कार्यकर्त्यांनी नेत्यांना ग्याही दिली या प्रसंगी उपस्थित संदीप महाले,योगेश पाटील,पंकज चौधरी,बबलू कदम,रमेश पाटील,दिलIप सोनवणे,रामकृष्ण माळी तसेच कार्यक्रमाच्या यशस्विते साठी अमोल माळी, गजानन माळी, अजय माळी, तुषार पाटील,जितेंद्र बराटे,सचिन भालेराव, लक्षीमन तायडे, गणेश कोळी, प्रवीण रोकडे, भागवत बोन्डे, चेतन पाटील, तेजस कोळी, किरण पाटील, अरुण भोई, योगेश कोलते, सचिन कोलते, समाधान केदार, संजय कोळी, अमोल माळी, योगेश राजपूत, विजय वले, आदी शेकडो कार्यकर्ते उस्थित होते. या वेळी राज ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन पक्षात कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. त्यात दत्तात्रय सोनटक्के, हेमंत कोळी, समाधान पाटील, अनिल कोळी, उमेश धनगर, दीपक निकम, गोकुळ धनगर, नरेंद्र पाटील, दत्तू पाटील, गोलू पाटील, अतुल पाटील, आकाश भिल, बापू पाटील, रवी जिरे, गजानन माळी, समाधान कोळी, संजय कोळी, लक्षीमन तायडे अशा शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. सूत्र संचालन मुकुंदा रोटे यांनी केले तर आभार अमोल माळी यांनी मानले.








