पालकमंत्री पाटील : शिरसोलीत ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार
जळगाव ( प्रतिनिधी ) – सत्ता ही टिकवण्यासाठी नाही, तर समाजाच्या सेवेसाठी असते. जनतेच्या सेवेतून मला ऊर्जा मिळते. त्यासाठीच मी अहोरात्र झटतो असे म्हणत, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरी सत्कारावेळी ठणकावून सांगितले.
शिरसोली ता. जळगाव येथे बारी पंचमंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी श्री विठ्ठल रखुमाई मातेची मूर्ती, नागवेल पानाचा कंडा, शाल श्रीफळ देऊन पालकमंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. गावातील विविध समाजिक संस्था व गावातील विविध मंडळ, युवासेना, शिवसेना, भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला युवती सेनेच्या पदाधिकारी यांच्यातर्फेही पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खास शैलीत विरोधकांना सुनावत जनतेच्या मनातला सूर व्यक्त केला. ‘हा केवळ सत्कार नाही, तर तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची पोचपावती आहे. मी तुमच्या सेवेत सदैव तत्पर राहीन, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासिकासह बारी समाज मंगल कार्यालय लवकरच उभारणार असून ५ कोटींच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन १५ दिवसांत करणार आहे. ३३ वीज उपकेंद्र मंजूर केले असून, बारी समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी ‘संत श्री रुपलाल महाराज आर्थिक महामंडळ’ स्थापन केल्याने समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. नागवेलची पाने, बारी समाजाची शान, शिरसोलीच्या विकासासाठी मी आहे ठाम ! असे सांगताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. हायस्कूलचे चेअरमन विलास बारी यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासिका, बारी समाज मंगल कार्यालय आणि महिला बचत गटांसाठी उमेद भवन उभारण्याची मागणी केली. युवासेनेचे रामकृष्ण काटोले, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर महाजन, भाजपचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश अस्वार यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. गिरीश वराडे यांनी आभार मानले.
व्यासपीठावर नंदलाल पाटील, पप्पू सोनवणे, धनूबाई आंबटकर, मनोहर पाटीत, सरपंच हिलात भील, सोसायटीचे चेअरमन बाला पाटील, सूर्यवंशी बारी पंचमंडळाचे अध्यक्ष भीमा अस्वार, अर्जुन काटोले, रामकृष्ण कटोले, रवींद्र बारी, देवराम नागपुरे, शरद चव्हाण, राजेंद्र आंबटकर, गिरीषा वराडे, रामदास ताडे, गोकुळ ताडे, लक्ष्मण नाईक, रघुनाथ फुसे, मोहन बुंधे, मुकेश अस्वार, नंदलाल सुने, शिवदास बारी, विलास बारी, उमाजी पानगळे, प्रणय सोनवणे, मुदस्सर पिंजारी, विनोद अस्वार, भगवान बोबडे, अर्जुन पाटील, जितू पाटील, युवासेनेचे रामकृष्ण काटोले, रमेश पाटील, संदीप सुरळकर, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, मनोज चौधरी, अकील मणियार, विजय पाटील, बबन धनगर, राजू पाटील, बापू मराठे, नारायण सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला महिला व महायुतीचे पदाधिकारी, गावातील समाजबांधव, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.