मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात कोरोना काळात वाहतूक व्यवस्था अनेक दिवस ठप्प होती. एसटी आणि रेल्वेसेवा अजूनही काही प्रमाणातच सुरु आहे.महाराष्ट्रातील एसटी सेवा या कोरोनाकाळात डबघाईला आलेली आहे, तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने आता मोठा निर्णय घेतला आहे.महामंडळाने लॉकडाऊनमुळे सुमारे 10 हजार कर्माचाऱ्यांना नारळ दिला आहे. कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली आहे. महामंडळानं घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
राज्यातील एसटी महामंडळानं याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटीबंद असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
या पत्रात असं लिहिण्यात आली कि , सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाईल, असही पत्रकात म्हटलं आहे.







