जयपुर (वृत्तसंस्था) – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत भाजपाकडून आमदारांचा घोडेबाजार केला जात असून २० कोटींना खरेदी केली जाते. जयपुर मध्ये असाच घोडेबाजार झाला असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे गेहलोत म्हणाले.
राजस्थानमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाने त्यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना गेहलोत यांनी भाजपवर आरोप केले आहेत. कर्नाटक, मध्यप्रदेश सारखा खेळ राजस्थानमध्येही रचला गेला होता. मात्र आमच्याकडे पूर्ण बहुमत असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले.
गेहलोत म्हणाले, ‘जयपूरमध्ये घोडेबाजार झाला असून आपल्याकडे पुरावे आहेत. आम्हाला १० दिवसांसाठी आमच्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवावं लागलं. अन्यथा मनेसर येथे जे झालं तेच येथेही होताना दिसलं होतं,’
गेहलोत सचिन पायलट यांच्यावर सुद्धा निशाणा साधला, ‘केवळ चांगले इंग्रजी बोलणे, चांगले बाइट्स देणे आणि देखणे असणे यावर सारकही अवलंबून नसते. देशाबद्दल, तुमच्या विचाधारेबद्दल, धोरणांबद्दल आणि या सर्वांशी असलेल्या बांधिलकीबाबत तुमच्या हृदयात नेमकं काय आहे, हे देखील महत्वाचं असल्याचे गेहलोत म्हणाले.