नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – म्यानमारमध्ये लष्करी हुकूमशहांविरुद्ध सुरू असलेल्या जनआंदोलनाला तोंड देण्यासाठी सैन्य सतत क्रूर पद्धती अवलंबत आहेत. आता म्यानमारमध्ये लष्कराने गाव आणि शाळेवर हल्ला केला आहे.
या हल्ल्यांत 7 मुलांसह 13 लोकांची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, अनेक नागरिक जखमी आहेत. म्यानमार लष्काराने केलेल्या हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी जंगलाकडे धाव घेतली. या हल्ल्यानंतर म्यानमारमधील जनतेवर पुन्हा एकदा दडपशाहीचा काळ वाढला आहे.
रिपोर्टनुसार, म्यानमारचे दुसरे सर्वात मोठं शहर मंडालेपासून सुमारे 110 किमी अंतरावर असलेल्या तबायिनच्या लेट यट कोन गावात शुक्रवारी हा हल्ला झाला. शाळेच्या प्रशासकाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्यानमार आर्मीची चार Mi-35 हेलिकॉप्टर गावाच्या उत्तरेला फिरत होतं. त्यापैकी दोन हेलिकॉप्टर पुढे गेले.तर 2 हेलिकॉप्टरने शाळेवर मशीन गन आणि अवजड शस्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. शाळेच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांवर दोन्ही हेलिकॉप्टरने गोळीबार केला. शाळेवर हल्ला होत असल्याचे पाहून व्यवस्थापनाच्या लोकांनी विद्यार्थांना मैदानातून सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न केला.
पण तोपर्यंत 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.