जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील मयूर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ४ जणांविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती वरून, जळगाव शहरातील मयूर कॉलनी परिसरातील एका भागात ४७ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह राहायला आहे. ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता काहीही कारण नसताना समाधान खंडू सोनवणे, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि शालक चौघे रा. राजीव गांधी नगर, जळगाव अशा चौघांनी काही कारण नसताना महिलेचे पती व पुतण्या यांना बेदम मारहाण केली, त्यानंतर एकाने महिलेचा हात पकडून विनयभंग केला. आणि महिलेचे पती आणि पुतण्या यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली घडल्यानंतर पिडीत महिलेने रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी ११ जून रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोहेकॉ उषा सोनवणे करीत आहे.