ओबीसी विद्यार्थी पालक शिक्षक असोसिएशनचे
आमदार अनिल पाटील यांना निवेदन
अमळनेर ( प्रतिनिधी ) – महात्मा फुले स्मृतिदिनी फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. देशाच्या नव्या विचारात आणि सार्वजनिक शैक्षणिक सर्वांगीण विकासात या दाम्पत्यांचे फार मोठे योगदान आहे.
फुले दांपत्यास भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी राष्ट्रपतींना पाच हजार पोस्टकार्ड राज्यातून ओबीसी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाठवली होती जिल्ह्यातून सह्यांची मोहीम राबवली होती अनेक पुरोगामी विचारांच्या संघटनांनी ही मागणी केली आहे याची जाणीव शासनाला असावी विविध संघटनांनी महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडे निवेदने पाठवली आहेत. आतापर्यंत काही व्यक्तीना भारतरत्न पुरस्कार देताना शासनाने निकषात बदल करुन दिला आहे. फुले दांपत्याचे एवढे मोठे कार्य असूनही ते दांपत्य पुरस्कारापासून वंचित आहे ही शोकांतिका आहे.
अमळनेर तालुक्याचे आमदार असल्याने हा प्रश्न उचलून धरावा व शासन दरबारी पोहचवावा अशी मागणी ओबीसी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन , महिला जिल्हाध्यक्ष वसुंधरा लांडगे, तालुकाध्यक्ष सोपान भवरे, शहराध्यक्ष डी.ए सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष भारती चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य एन. आर चौधरी , मनोहर पाटील, पक्षीमित्र अश्विन पाटील, समता शिक्षक परीषदेचे अजय भामरे, सल्लागार दशरथ लांडगे यांनी निवेदनाद्वारे आमदार अनिल पाटील यांच्याकडे केली.







