मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्यातल्या महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखांच्या घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरला आरक्षण सोडत होणार आहे उल्हासनगरसाठी 26आॅक्टोबर आणि उर्वरित महानगरपालिकांसाठी 28 ऑक्टोबरला सोडत होणार आहे.
आरक्षण सोडतीनंतर प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करता येतील . मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा महानगरपालिकांची मुदत मार्च-एप्रिल 2022 मध्ये संपत आहे. तत्पूर्वी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले.
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेला 22 आक्टोबर 2021पर्यंत मान्यता देण्यात येईल. मुंबईची व उर्वरित महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 28 नोव्हेंबररोजी प्रसिद्ध केले जाईल.