पाटणा (प्रतिनिधी) – चारा घोटाळा प्रकरणाशी संबंधित चाईबासा ट्रेजरी प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाला आहे. झारखंड हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी लालू प्रसाद यादव हे जेलमध्येच राहणार आहेत, कारण त्यांच्यावर दुमका कोषागार प्रकरणात देखील आरोप आहेत.
माहितीनुसार, लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळा प्रकरणात तीन वेगवेगळ्या केसमध्ये आरोपी आहेत. त्यांना या प्रकरणी 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 23 डिसेंबर 2017 पासून ते झारखंच्या राजेन्द्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) मध्ये भरती आहेत. काही महिन्यांपूर्वी कोरोना व्हाययस पासून वाचण्यासाठी त्यांना रिम्स संचालकांच्या बंगल्यात शिफ्ट केलं असल्याची माहिती आहे.







