जळगाव ( प्रतिनिधी ) घरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा त्याच्याच दोन्ही मुलांनी खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
प्रेमसिंग अभिसींग राठोड (वय ५०) हे निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाच्या परिसरात वास्तव्यास आहेत. पत्नी , दोन मुले, दोन मुली यांच्यासह ते येथे राहतात ते काही दिवसांपासून आजारी असल्याने आज त्यांना त्यांची मुले दीपक आणि गोपाळ यांनी दवाखान्यात जाण्याचे सुचविले. मात्र प्रेमसिंग यांनी नकार दिला. यावर घरात वाद झाला.
या वादातूनच प्रेमसिंग यांनी चाकू उगारून मुलांना धमकावले. या झटापटीत दोन्ही मुलांनी चाकूने बापावर वार करून खून केला .तालुका पोलीस स्थानकाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीपक आणि गोपाळ या मुलांना ताब्यात घेतले घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.