चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरी
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- घराबाहेर बांधलेल्या शेळ्या चोरून नेणाऱ्या चोरट्ट्यांना पकडण्यात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण बाळासाहेब तिकांडे (४६, रा. शिंदी, ता. चाळीसगाव) हे खराडी शिवारात (गट नं. २३/३/ड/अ ) कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान, त्यांच्या घराबाहेर बांधलेल्या शेळ्या चोरटे चोरुन नेत होते. आवाज ऐकून फिर्यादी झोपेतून उठले आणि चोरट्यांचा पाठलाग केला. हिरापुर येथे चोरट्यांना पकडले असता संशयित आरोपी हे त्यांचे ताब्यातील बकऱ्यांनी भरलेली ग्रे कलरची कार क्र. एमएच ०१एनए ५५८ जागीच सोडून पसार झाले. दरम्यान, वाहनात एकूण ८ शेळ्या मिळून आल्या. त्यात नारायण तिकांडे यांच्या तीन शेळ्या होत्या. याबाबत फिर्यादी तिकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामीण पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरवून या गुन्ह्यातील शांताराम उर्फ जिभ्या सुकलाल गायकवाड ( २९, रा. पिंपरखेड, ता. भडगाव), अमोल महादु मालचे (२२, रा. यशवंत नगर, भडगाव), सुनिल बापु देवरे (भील) २३, रा. लोणी सीम, ता. पारोळा) अशांचा शोध घेवुन त्यांना वरील गुन्ह्याकामी अटक केली असता नमुद आरोपीतांनी चाळीसगाव तालुका व जवळपासच्या परिसरात तसेच जळगाव, धुळे, मालेगाव, नंदुरबार, संभाजीनगर ग्रामीण परिसरात सुद्धा अशाच प्रकारे बकऱ्या चोरीसारखे बरेच गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनि कुणाल चव्हाण, पोउनि राहुल राजपुत, सहा.पोउपनि युवराज नाईक, पो.हे.कॉ. रविंद्र रावते, पो.हे.कॉ. प्रविण संगेले, पो.हे.कॉ. नितीन सोनवणे, पो.हे.कॉ. संदीप पाटील, पो.हे.कॉ. अकरम बेग, पो.ना. भगवान माळी, पो.कॉ. सुनिल पाटील, पो.कॉ. प्रदीप पवार यांनी केली आहे. पुढील तपास पो.ना. भगवान माळी हे करीत आहेत.