जळगाव (प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील हिवरखेडे बु.येथील भुषण पाटील सुर्यवंशी युवा गुर्जर महासभा जिल्हाध्यक्ष यांचे काकाअशोक पाटील दुसखेडे ता.पाचोरा ह.मु.अहमदाबाद व त्यांचे सहकारी जगदीश पाटील ,जितेंद्र पाटील ,शेलेश पटेल यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांचे स्वच्छ भारत ,स्वस्थ भारत अभियान राबवत अहमदाबाद ते कन्याकुमारीपर्यंत ३१७० कि.मी.सायकल प्रवास २९ दिवसात पार पाडला .
त्यामध्ये ५ ज्योतिर्लिंग चे दर्शन घेत अभियान राबवत गेले.त्र्यंबकेश्वर ,घृष्णेश्वर ,ओंकारेश्वर ,भिमाशंकर , मल्लिकार्जुन ,तिरूपती बालाजी ,रामेश्वरम , कन्याकुमारीपर्यंत असा सायकल प्रवास केला .अशोक पाटील यांनी सायकल प्रवास वेळी १ लाख २५ हजार महामृत्यृंजय जाप सुद्धा केले.अशोक पाटील यांनी हिवरखेडे बु येथे आज रोजी भेट दिली असता त्यांच्या नातेवाईक व ग्रामस्थ हिवरखेडे यांनी सत्कार केला.त्यावेळी उपस्थित समाजसेवक वाय जे.महाजन ,वैभव महाजन ,भुषण पाटील सुर्यवंशी ,बाळू पाटील ,अमोल पाटील ,राजेश्वर पाटील ,आकाश महाजन ,गोपाल महाजन ,विपुल महाजन ,मुकेश पाटील ,सचिन पाटील ,गौरव महाजन ,उत्कर्ष महाजन ,किशोर महाजन , ईश्वर पाटील यांनी सत्कार केला.