सावदा (प्रतिनिधी) – कोचूर ,चिनावल , वडगाव ,कुभारखेडा रोझोदा सावखेडा परिसरात दि १९ रोजी सांयकाळी ६ वाजता जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
कोचूर ,चिनावल वडगाव , कुंभार खेडा रोझोदा सावखेडा कळमोदा शेती शिवारात काल झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या झटक्याने एका क्षणात हिरावला गेला आहे या मुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ऐन पोटरीत तसेच कापणी च्या मार्गावर असतानाच कालच्या पावसाने व वादळाने ज्वारी ,मका .व केळी कपाशी अक्षरक्षहा उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने या नुकसानी ची त्वरित दखल घेवून पंचनामे करावे व शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनकडून मागणी होत आहे.
आ चंद्रकांत पाटील व आ शिरीष चौधरी यांनी नुकसान ग्रस्त शेताची पाहणी करत उपविभागीय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सरसकट पंचनामा करा एकही शेतकरी वंचित राहु नये अशा सूचना केल्या.
अनेक गावात विजपुरठा गायब
अतिशय वेगाने आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसाळ्यामुळे मोठे वृक्ष यांसह विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे उशिरा रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होत
केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले
उत्पादकांना याआधीच आपली केळी कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर कमी भावात विक्री करावी लागली आहे त्यात सि एम व्ही व्हायरसने नवीन लावलेली केळी उपटून ठेवावी लागत आहे काही प्रमाणात शेतात केळी शिल्लक असल्याने तिला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मोठ्या पल्लवीत झाल्या होत्या परंतु काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतात थोड्याफार प्रमाणात शिल्लक राहिलेली केळी सुद्धा जमीनदोस्त झाली आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे पुरते कंबरडेच मोडले आहेयावेळी कोचुर येथील शालीग्राम पाटील ,कमलाकर पाटील ,सुभाष पाटील, प्रशांत पाटील, मंगेश पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते . मंडळ अधिकारी संदीप जयस्वाल तलाठी शीतल बाबर यांची ही उपस्थिती होती.






