जिल्ह्यातील २९ गावांमध्ये वीर जवानांच्या स्मरणार्थ शहीद स्मारक होणार उभे
जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत रविवारी दि. १७ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत या स्मारकांना मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याला अनुसरून लगेच आज सोमवारी दि. १८ रोजी शासनस्तरावरून मंजुरी कळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा नियोजन अधिकारी यांना शासनाने याबाबत आदेश कळवले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २९ ठिकाणी ऐतिहासिक व प्रेरणादायी शहीद स्मारक उभारले जाणार असून, शहीद कुटुंबांचा सन्मान आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे केंद्रबिंदू गावोगावी उभे राहणार आहेत.