मुंबई ;- कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता आजपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात संचार बंदीचा निर्णय जाहीर केला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा तोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.सर्वांनी काल जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. मात्र, थाळ्या वाजवणे म्हणजे व्हायरस घालवणे नाही. पुढचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे नाईविलाजाने राज्यात मला संचारबंदी जाहीर करावी लागणार आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्यीय विमान उड्डाणं बंद करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता देशातील सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतूक विमाने सुरू असणार आहेत