चंदकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने रावेर तालुक्यातील खिर्डी येथील पत्रकार यांची गुणवंत पाटील यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया, वृत्तपत्र विक्रेता, सामाजिक कार्य, महिला मंच या कार्यकारणी सदस्यांची समितीची शिफारस केंद्रीय समितीला करण्याची जबाबदारीसुद्धा देण्यात आलेली आहे.यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात समित्या संघटित करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या निवडीचे पत्र त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुपे, राष्ट्रीय उपाध्यक्ष युनूस खान, राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सावळे व महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांनी दिले आहे.
त्यांचे निवडीबद्दल खिर्डी येथील तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष कांतीलाल गाढे, उपाध्यक्ष- प्रदीप महाराज, सचिव- शेख इद्रिस, कोषाध्यक्ष- संकेत पाटील, ज्येष्ठ सदस्य – चंद्रकांत भाऊ कोळी, प्रवीण धुंदले, रितेश महाराज, सतीश फेगडे, भीमराव कोचुरे, सादिक पिंजारी, अंकित पाटील, विनायक जहुरे आदिसह परिसरातील पत्रकार यांनी अभिनंदन केले.