जळगाव – गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे जागतिक दूरसंचार दिन दिनांक १७ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमीत्ताने दुरसंचार तंत्रज्ञानाच्या भविष्यावर विचारमंथन करण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतर्गत टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाचा विषय होता डिजिटल परिवर्तनात लिंग समानता जो संपूर्ण कार्यक्रमात प्रभावीपणे प्रतिध्वनित झाला.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता व विभाग प्रमुख डॉ. हेमंत इंगळे हे उपस्थित होते त्यांच्यासोबत विभागातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी दूरसंचार क्षेत्राचा इतिहास, ५जी तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आणि डिजिटल भविष्य यासारख्या विविध विषयांवर े विचार नवे दृष्टिकोन आणि सखोल समजून घेण्याचे प्रतीक होते.सुहास सोलंके, से जल सातव, शरीख शेख, तुलजा महाजन, प्रथमेश पवार, यामिनी पाटील, नूतन चौधरी, प्रतिज्ञा धामाने, राजेश्री शेलार, कपिल चव्हाण, साक्षी उबाळे, प्रणव थोरात, गणेश कोलते आणि उत्कर्षा पाटील यांनी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या भविष्यावर विचारमंथन केले.डॉ. हेमंत इंगळे यांनी मार्गदर्शन करतांना दूरसंचार हे आधुनिक डिजिटल युगाचे बळकट आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग क्षेत्रातील दूरसंचारच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून या क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमातून केवळ दूरसंचार क्षेत्राचे महत्त्व नाही, तर भविष्यातील टेलिकॉम क्षेत्रातील नेतृत्व घडवण्यासाठी एक दिशादर्शक मंच म्हणून त्याची नोंद झाली. डिजिटल समावेश, तंत्रज्ञान सक्षमीकरण आणि कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास याबाबत जागरूकता निर्माण झाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रा. आर.व्हि पाटील सर यांनी केले व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लीना आहिर व खुशबू पिसाळकर यांनी केले.