चोपडा (प्रतिनिधी) – कौंटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे घडली .
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातल्या फुले नगरातील रहिवासी संजय पुंजू चव्हाण (वय ४८) याचे रविवारी सायंकाळी पत्नी मीराबाई चव्हाण हिच्यासोबत भांडण झाले. त्याने संतापात पत्नीवर विळ्याने वार केले. तिच्या मांडीला जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला .
जखमी मीराबाई चव्हाण (वय ४०) यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मीराबाईंचा मृत्यू झाला. या दाम्पत्याचा मुलगा सागर चव्हाण याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.