नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून इशारा
भुसावळ(प्रतिनिधी ) ;-: हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसझाल्याने धरणात पाणी वाढल्याने हतनूर धरणाचे 10 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून 19,105 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मध्य प्रदेशात आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तापी- पूर्णा नदीला पूर आला असून, हतनूर धरण क्षेत्रात पाण्याचा स्रोत वाढला आहे . हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहे.