जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील साई नगरात बकऱ्या चोरण्याच्या कारणावरून दोन जणांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार रविवारी ९ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता घडला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात एमआयडीसी दोघांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून, साईनगरात बाजीराव बाबासाहेब खामकर आणि अकीब अकिब पटेल हे दोघं आपापल्या कुटुंबीयांचा राहायला आहे. रविवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता बकरी चोरल्याच्या कारणावरून बाजीराव खामकर आणि अकिब पटेल यांच्यात हाणामारी झाली. जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान या संदर्भात दोघांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोघांच्या तक्रारीवरून परस्परविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.