जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मन्यारखेडा गावाच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी सोमवारी १९ जून रोजी मनसेचे कार्यकर्ते आले होते. त्यांच्यावर, रस्ता अडवणूक करून प्रशासनाला व जनतेला वेठीस धरल्या प्रकरणी दंगाविरोधी कलमानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मन्यारखेडा गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीपुरवठा मंत्री असून देखील गावांमध्ये पाणी मिळत नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान सार्वजनिक रस्ता अडवून प्रशासनाला व जनतेला वेठीस धरल्याप्रकरणी तसेच रस्त्यात बसून घोषणाबाजी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १८ कार्यकर्त्यांवर दंगाविरोधी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक भरत चव्हाण फिर्यादी आहेत.
मुकुंद आनंद रोटे (वय ४२, रा. नशिराबाद), विनोद शंकर शिंदे (व्य ४१, जैनाबाद्), राजेंद्र सुकलाल निकम, (वय् ४३, कोल्हेहिलस परिसर, जळगाव), आशिष उत्तम सपकाळे (वय् ४३, दांडेकर नगर्), चेतन दिलीप आढळकर (वय ४३, यावल), ललित गौरीशंकर शर्मा (वय ३९, सुभाष चौक, जळगाव), हेमंत मधुकर कोळी (वय ३२, विदगाव), विकास निंबा पाथरे (वय् ३२, नायगाव ता.यावल), शैलेश् पुंडलिक चौधरी (वय ३२, नांद्रा ता.जळगाव), गणेश अरुण कोळी (वय ३५, खर्दे ता. धरणगाव), मनोज सुरेश घुगे (वय् ३२, चिंचोली जळगाव), भाईदास जालम् बागले (वय ३४, मन्यारखेडा ता. जळगाव), आनंदा सुभाष बागले (वय् ३२ मन्यारखेडा), अविनाश प्रकाश जोशी (वय ३५, रथ चौक जळगाव), संजय मानसिंग मोती (वय ५१, मोहाडी रोड जळगाव), सागर गणेश शिंपी (वय २५, द्वारका नगर जळगाव), महेश वासुदेव माळी (वय ३५, रामेश्वर कॉलनी, जळगाव), राजेश दीपक कोळी (वय २१, मन्यारखेडा , जळगाव) असे संशयित आरोपींची नावे आहेत.