डॉ.वर्षा पाटील वूमन्स कॉलेजमध्ये दहीहंडी उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वूमनस कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन महाविद्यालयात दहीहंडी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डॉ.वारके म्हणाल्या की, दही हंडी फोडताना जसे थर मांडले जातात, त्याला एक पाया असतो आणि तोच पाया महत्वाचा असतो. जर पायाच कमकुवत असला तर वरचे थर लगेच पडतील त्याप्रमाणे जर तुम्ही शिक्षण घेतांना पाया मजबूत केला तर आयुष्यात तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. निरंतर वाचन व सराव हा कधीही लाभदायक राहतो. आपले ज्ञान नेहमी अद्ययावत ठेवा कारण कंपनी मध्ये काम करताना तुम्हाला त्याची गरज पडेल. त्याचबरोबर शिक्षण घेताना आपण महाविद्यालयात काही कार्यक्रमामध्ये भाग घेतला की आपल्यामध्ये नेतृत्व, आत्मविश्वास इत्यादी गुण वाढतात व त्याचा फायदा आपल्याला कंपनीमध्ये होतो. आपण टीम वर्क व समन्वय शिकले पाहिजे ते खूप महत्वाचे आहे आणि कंपनीमध्ये तसेच अपेक्षित आहे. यावेळी महाविद्यालयामधील विद्यार्थिनींनी कृष्ण व राधाचा वेष धारण केला होता. सदर कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते