जळगाव (प्रतिनिधी) :- गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे पहिले आवर्तन २ हजार क्यूसेस (५६. ६३क्युमेक्स) ने सोडण्यात आलेले आहे. यामुळे पाचोरा, भडगाव नगरपालिका तसेच चाळीसगाव एमआयडीसी येथील पाणी प्रश्न सुटणार आहे.
गिरणा प्रकल्पामधून औद्योगिक विकास महामंडळ, धुळे अंतर्गत चाळीसगांव एमआयडीसी, नगरपरिषद भडगांव, नगरपरिषद पाचोरा यांनी केलेल्या पाणी सोडणेबाबतच्या मागणीनुसार आज दि. १३ रोजी सकाळी ६ वाजता कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे पहिले आवर्तन २ हजार क्यूसेस (५६. ६३क्युमेक्स) ने सोडण्यात आलेले आहे. पिण्याच्या पाण्याचे पहिले आवर्तन भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानळदापर्यंत आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठीचे असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे अधिकाऱ्यांनी कळविली आहे.