चाळीसगाव (प्रतिनिधी) – गिरणा धरणात आज दि. १२ सप्टेंबर रोजी गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १०० टक्के पाणी साठा झाला आहे, असे गिरणा पाटबंधारे विभागामार्फत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गिरणा काठासह परीसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.
जळगावसह तीन जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारे गिरणा धरणा परिक्षेत्रात दमदार पावासामुळे गिरण धरण आज १०० टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु असल्याने धरण भरले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच शंभर टक्के पूर्णपणे भरल्यामुळे शेतकर्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.