जळगाव शहराजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी पुलावरून एका ४५ वर्षीय व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवार १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर गोविंदा नन्नवरे (वय-४५, रा.बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. शेतमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बांभोरी गावाजवळ मंगळवारी दि. १२ मार्च रोजी गिरणा नदीच्या पुलावरून ज्ञानेश्वर गोविंदा नन्नवरे यांनी मंगळवार १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही.
दरम्यान ही घटना ग्रामस्थांना लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी नंतर मयत घोषित केले. घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्याचे अंतर्गत पालधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.